मागेल त्याला सोलार योजनेमध्ये पैसे भरले तर खरंच सोलर मिळतो का.? जाणून घ्या या योजनेविषयी सविस्तर माहिती..

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी कदाचित “मागेल त्याला सोलार योजने” अंतर्गत अर्ज भरलेला असेल. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कुसुम योजना, महावितरण मेढा योजना इत्यादी योजनांअंतर्गत सोलार योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत. आता, जर तुम्ही देखील पैसे भरण्याच्या तयारीत असाल आणि “पैसे भरण्याचा मेसेज” तुम्हाला आला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सोलार योजनेअंतर्गत अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांची छाननी केली जाते. अर्जाची छाननी करत असताना काही चुका किंवा त्रुटी दिसल्यास, त्या सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यास सांगितले जाते. या कागदपत्रांचा पुनरावलोकन केल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाते.

Mobile Tower Installation: मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर लावून घरबसल्या कमवा 50 ते 70 हजार रुपये

अर्ज मंजूर झाल्यानंतर, शेतकऱ्यांना “पैसे भरण्याचा ऑप्शन” मिळतो. हा पेमेंट ठराविक रक्कमेचा असतो आणि शेतकऱ्याने अर्ज केलेल्या एचपी नुसार पैसे भरणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, 3 एचपी करिता अर्ज केले असेल तर त्या प्रमाणे रक्कम भरावी लागेल. पैसे भरल्यानंतर अर्ज सशक्त होतो, आणि पुढील प्रक्रिया सुरू होते.

पैसे भरल्यानंतर, वेंडर निवडीचा ऑप्शन देखील दिला जातो. वेंडर निवड झाल्यानंतर, शेतकऱ्याच्या ठिकाणी “जॉईंट सर्वेक्षण” केला जातो. यामध्ये सोलार इन्स्टॉलेशनसाठी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक कर्मचारी शेतकऱ्याच्या सर्व तपासणीसाठी उपस्थित असतात. यावेळी शेतकऱ्याच्या स्थानाची तपासणी केली जाते, जसे की विहिरीचा किंवा बोरवेलचा प्रमाणपत्र, तसेच आधार कार्ड व सातबाऱ्याच्या माहितीसुद्धा तपासल्या जातात.

सर्व तपासण्या आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सोलार पंप शेतकऱ्यांच्या ठिकाणी इन्स्टॉल केला जातो. शेतकऱ्याला सोलार मिळाल्यावर, कंपनीच्या टीमकडून एक फोटो घेऊन वेबसाईटवर अपलोड केला जातो. नंतर अधिकारी त्या ठिकाणी भेट देऊन इन्स्टॉल झालेल्या सोलारची सत्यता तपासतात.

या सर्व प्रक्रियेत सोलार पंप इन्स्टॉल झाल्यानंतर, शेतकऱ्याला पुढे सोलार वापरण्याची परवानगी मिळते. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तीन लाख सोलार पंप इन्स्टॉल करण्यात आले आहेत.

Leave a Comment