बोर्ड परीक्षा 2025: अफवांवर विश्वास ठेवू नका!
दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत. मात्र, या संदर्भातील कोणतीही माहिती खोटी असल्याचं शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. “दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
अधिकृत माहिती काय आहे?
शालेय शिक्षण विभागाने सांगितलं की, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या परीक्षा अत्यावश्यक आहेत. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहेत:
Rooftop Subsidy in Maharashtra: घरावरील सोलर पॅनल ऑनलाईन योजना अर्ज सुरु यांना मिळणार 100% टक्के अनुदान
- दहावी (SSC): 29 एप्रिल ते 20 मे 2025
- बारावी (HSC): 23 एप्रिल ते 21 मे 2025
या परीक्षा राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित केल्या जातील.
व्हायरल मेसेजचं सत्य
सध्या सोशल मीडियावर दहावीच्या परीक्षा रद्द होणार असल्याचा दावा करणारा एक मेसेज फिरत आहे. मात्र, या मेसेजमध्ये कोणताही आधार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतल्यास तो अधिकृतरित्या जाहीर केला जातो.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
अशा अफवांना बळी न पडता, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. प्रश्नपत्रिकेची तयारी आणि वेळापत्रकानुसार अभ्यास सुरू ठेवा.